Posts

सुरुवात..

उर्मी बसलेल्या घावांना या वेळी जवळून न्याहाळून बघायचं आहे कितीतरी वेळ तसंच .... काही निर्णय आणि त्यानंतर बराचसा संयम ..... कुठेतरी सुरुवात करावीच लागेल हो , यावेळी हेच ठरवलंय !!!

मतदान

मी आज मतदान केलंय होय , मी आज मतदान केलंय. सैल जिभेने बरळणाऱ्या आणि धरणात मुतणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारण्यासाठी मी आज मतदान केलंय . उठसूठ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ‘ राडा संस्कृती ’ त शोधणाऱ्या झुंडशाहीला लोकशाहीचं ‘ खरं बळ ’ दाखवण्यासाठी मी आज मतदान केलंय . समोर सगळं जळतंय हे दिसत असतानाही काहीही न करणाऱ्या धोरणलकव्याला ठोसा मारण्यासाठी मी आज मतदान केलंय. विज्ञानाच्या या युगात अजूनही ढाल- तलवारीची भाषा करून दिशाभूल करणाऱ्या स्वार्थी प्रवृत्तीला ठेचण्यासाठी मी आज मतदान केलंय . देशासाठी , भविष्यासाठी , उज्ज्वल उद्यासाठी किंवा भावी पिढीसाठी नव्हे तर   माझ्यासाठी स्वत:साठी मी आज मतदान केलंय.

‘इट्स कॉंप्लिकेटेड’

 “टाईमपास बघितलास का? “ मित्राचा फोनवर पहिलाच प्रश्न. “हो. आजच तू?” “मीसुद्धा आजच पाहिला.” “कसा वाटला?”    “ठीक. मात्र हा विषय वेगळा आहे.” ‘टाईमपास’बद्दल एकदोन मित्रांनी बरंच काही सांगितलं, की ‘हा विषय वेगळा आहे.’, ‘ दिग्दर्शकाने पौगंडावस्थेतील प्रेम अलगदपणे हळुवार मांडलंय’, एका मित्राने तर रिलेशनशिप, स्पेस वगैरे जाडजूड शब्द वापरून काहीबाही सांगितलं. आता तर व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने येणारे लेखही तेच - पौगंडावस्थेतील मुलांच्या प्रेमाबद्दल लिहिताहेत. त्याच पौगंडावस्थेतील मुलांच्या प्रेमाची ही एक बाजू .   ‘टाईमपास’मुळे म्हणा, उत्सुकता म्हणून म्हणा किंवा लेख लिहायच्या निमित्ताने म्हणा फेसबुकवर काही निवडक ‘यंगस्टर्सच्या’ प्रोफाइल्स पाहिल्या. (यंगस्टर्स शब्द लिहिताना स्वत: म्हातारे झालोय अशा अविर्भावात लिहावयाचा असावा बहुधा. कारण   इथं लिहिताना आपोआप तसा अभिनिवेश अंगात शिरतोय असं वाटतंय.) हे ‘यंगस्टर्स’ म्हणजे आमच्यापेक्षा अजून थोडे यंग - पंधरा, सोळा आणि सतरा या वयोगटातले. यातल्या अनेकांसाठी ‘रिलेशनशिपमध्ये असणे’ हे कॉमन होते. काहींच्या प्रोफाइल्स किंवा त्यांच्या स

यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द (भाग २).

      यशवंतरावांनी केंद्रात संरक्षण ,   परराष्ट्र ,   गृह ,   अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद आदी विविध पदे भूषवलीत हे खरं व ही सारी पदे भूषवणारे यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व हेही तेवढंच खरं. पण नाण्याची ही एक बाजू झाली. यशवंतरावांच्या दिल्ली कारकिर्दीला दुसरी एक बाजू होती ,   जी खूप कमीजणांना माहित असेल. यशवंतराव दिल्लीसाठी नेहमीच होते. पण दिल्ली त्यांच्यासाठी नव्हती. यशवंतरावांनी दिल्लीला आपलं सर्वस्व दिलं पण दिल्लीनं त्यांना कधीच आपलंसं करून घेतलं नाही. अर्थात खुद्द यशवंतरावही याला बरेचसे जबाबदार होते.         १९६२ साली चीनच्या आक्रमणानंतर केंद्रात नेहरूंना कणखर संरक्षणमंत्र्याची गरज भासू लागली. म्हणून यशवंतरावांना नेहरूंनी केंद्रात बोलवून घेतले. यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द आरंभीच्या १० वर्षांत त्यांची लोकप्रियता व देशातील मान्यता वाढविणारी ठरली. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्यांची पकड घट्ट राहिली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणीही असले तरी सत्तेची खरी सुत्रे त्यांच्याच हातात राहिली. १९६३ मध्ये कन्नमवारांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब देसाईंसार

यशवंतराव.. (भाग १)

      २०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल...     यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता , अस्सल साहित्यरसिक , कृष्णाकाठचा सह्यकडा , युगपुरुष , हिमालयाची ढाल , किर्तीवंत वगैरे , वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव...    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून

मुक्तायन:'बारसं ब्लॉगचं'

             Prathamesh's Blog या नावाने सुरू असलेला माझा ब्लॉग आता ' मुक्तायन ' या नव्या नावाने कात टाकतोय . या ब्लॉगपोस्टचं शीर्षक जरी ' बारसं ब्लॉगचं ' असलं तरी हे बारसं नाहीये . एखाद्या नवजात शिशूच्या नामकरणासारखं नव्या ब्लॉगच्या नामकरणाला बारसं उल्लेखणं यथार्थ ठरलं असतं . त्यामुळेच दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर होणार्या बदलाला बारसं कसं म्हणता , असा आक्षेप जर कुणी घेत असेल तर त्यात नक्कीच तथ्य आहे . ब्लॉगचं नवं नामकरण असंही शीर्षक योग्य ठरलं असत पण बारसं म्हणण्यामागे थोडा वेगळा विचार आहे . घरात होणारा बारशाचा सोहळा हा आनंददायी असतो . खचितच ब्लॉगच्या नामकरणाचा क्षणही मग ते दोन वर्षानंतर का असेना , तेवढाच आनंद ब्लॉग व ब्लॉगलेखकाच्या आयुष्यात घेऊन येतो . अर्थातच हा बदल फक्त नावापुरता आहे , विषय अथवा लेखनातला नाही . ब्लॉग सुरू करून तशी आता दोन वर्षे झालेली आहेत् सुरुवातीला काहीच माहित नव्हतं - ब्लॉग कसा असतो , काय लिहायचं असतं . नंतर मग इतरांचे ब्लॉग्