Posts

Showing posts from 2012

यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द (भाग २).

      यशवंतरावांनी केंद्रात संरक्षण ,   परराष्ट्र ,   गृह ,   अर्थ इ. महत्वाच्या खात्यांसह देशाचं उपपंतप्रधानपद आदी विविध पदे भूषवलीत हे खरं व ही सारी पदे भूषवणारे यशवंतराव हे पहिलं मराठी व्यक्तिमत्व हेही तेवढंच खरं. पण नाण्याची ही एक बाजू झाली. यशवंतरावांच्या दिल्ली कारकिर्दीला दुसरी एक बाजू होती ,   जी खूप कमीजणांना माहित असेल. यशवंतराव दिल्लीसाठी नेहमीच होते. पण दिल्ली त्यांच्यासाठी नव्हती. यशवंतरावांनी दिल्लीला आपलं सर्वस्व दिलं पण दिल्लीनं त्यांना कधीच आपलंसं करून घेतलं नाही. अर्थात खुद्द यशवंतरावही याला बरेचसे जबाबदार होते.         १९६२ साली चीनच्या आक्रमणानंतर केंद्रात नेहरूंना कणखर संरक्षणमंत्र्याची गरज भासू लागली. म्हणून यशवंतरावांना नेहरूंनी केंद्रात बोलवून घेतले. यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द आरंभीच्या १० वर्षांत त्यांची लोकप्रियता व देशातील मान्यता वाढविणारी ठरली. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्यांची पकड घट्ट राहिली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कोणीही असले तरी सत्तेची खरी सुत्रे त्यांच्याच हातात राहिली. १९६३ मध्ये कन्नमवारांच्या मृत्यूनंतर बाळासाहेब देसाईंसार

यशवंतराव.. (भाग १)

      २०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल...     यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता , अस्सल साहित्यरसिक , कृष्णाकाठचा सह्यकडा , युगपुरुष , हिमालयाची ढाल , किर्तीवंत वगैरे , वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव...    आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून

मुक्तायन:'बारसं ब्लॉगचं'

             Prathamesh's Blog या नावाने सुरू असलेला माझा ब्लॉग आता ' मुक्तायन ' या नव्या नावाने कात टाकतोय . या ब्लॉगपोस्टचं शीर्षक जरी ' बारसं ब्लॉगचं ' असलं तरी हे बारसं नाहीये . एखाद्या नवजात शिशूच्या नामकरणासारखं नव्या ब्लॉगच्या नामकरणाला बारसं उल्लेखणं यथार्थ ठरलं असतं . त्यामुळेच दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर होणार्या बदलाला बारसं कसं म्हणता , असा आक्षेप जर कुणी घेत असेल तर त्यात नक्कीच तथ्य आहे . ब्लॉगचं नवं नामकरण असंही शीर्षक योग्य ठरलं असत पण बारसं म्हणण्यामागे थोडा वेगळा विचार आहे . घरात होणारा बारशाचा सोहळा हा आनंददायी असतो . खचितच ब्लॉगच्या नामकरणाचा क्षणही मग ते दोन वर्षानंतर का असेना , तेवढाच आनंद ब्लॉग व ब्लॉगलेखकाच्या आयुष्यात घेऊन येतो . अर्थातच हा बदल फक्त नावापुरता आहे , विषय अथवा लेखनातला नाही . ब्लॉग सुरू करून तशी आता दोन वर्षे झालेली आहेत् सुरुवातीला काहीच माहित नव्हतं - ब्लॉग कसा असतो , काय लिहायचं असतं . नंतर मग इतरांचे ब्लॉग्

जागृती यात्रा भाग ११: हरितप्रदेशातून..

     खिडकीतून बघताना चोहीकडे सगळं कसं हिरवंगार दिसत होतं. मनाने अलवारसा कौल दिला 'उत्तरप्रदेश' आलं. मुबलक पाणी, सुपिक मृदा आणि आपल्याकडे नसते तशी लांबसडक शेती - 'हरितप्रदेश' व्याख्येला या तीन गोष्टी पुरेशा आहेत. उत्तरप्रदेशात पूर्वांचल या नावाने प्रसिद्ध असणा ऱ्या  प्रादेशिक विभागातलं देवरिया हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. देवरियाची विशेष अशी काहीच ओळख नाही पण 'जागृती यात्रा' राबवणाऱ्या जागृती सेवा संस्थानचं हे माहेरघर. देवरियापासून तासाभराच्या अंतरावर असलेलं 'बरपार' हे शशांक मणी (जागृतीचे संचालक) यांचं गाव. स्टेशनवर उतरताच देवरियात 'जागृती'चं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत झालं. तिथून मग लगेच आम्ही बरपारकडे पोहोचते झालो. अगोदर ठरल्याप्रमाणे 'बिझग्यान वृक्ष' (Bizgyan Tree) या स्वाध्यायासाठी आम्हाला बरपार व आसपासची दोन-तीन गावे पालथी घालायची होती. सर्व संघ मग एकत्र जमले. बिझग्यान ही स्वाध्यायाबरोबरच एकमेकांमध्ये स्पर्धाही असल्याने प्रत्येक संघ आपापली व्यूहरचना रचायच्या तयारीला लागला. गावे छोटी-छोटी व जवळ असल्याने एकदम तीन चार गावांच

जागृती यात्रा भाग १० : बिहारचं 'निदान'

Image
     ३१ डिसेंबर ट्रेनमध्ये साजरा करणे ह्यात वेगळं काहीही नाही. पण नववर्षारंभाचा डान्स ट्रेनमध्ये करणं हा पूर्णपणे नवा अनुभव आमच्यापैकी प्रत्येकजण अनुभवत होता. नवीन वर्ष असल्याने म्हणा किंवा शेड्युलमध्ये असल्याने म्हणा १ जानेवारीला आम्हाला सुट्टी दिली होती. त्या दिवशी ट्रेनमध्ये मात्र विविध सेशन आयोजित केले होते. ट्रेनने अजून ओरिसा सोडलं नव्हतं. ओरिसाच्या सीमेजवळ  कुठेतरी आम्ही होतो. डायरीमध्ये मी काहीतरी टिपत बसलो होतो. साधारणत: दुपारच्या सुमारास ओरिसाची सीमा संपवून पश्चिम बंगालमध्ये आम्ही प्रवेश केला. डायरी तशीच ठेवून मी खिडकी पकडली. बंगभूमी..! रवींद्रनाथ टागोरांची भूमी, विवेकानंदाची भूमी, सुभाषबाबूंची भूमी, सत्यजित रेंची भूमी, कम्युनिस्टांची भूमी. बंगाल या प्रांताबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. या भूमीने देशाला अनेक बुद्धिवंत माणके दिलेली आहेत हे तर सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहेच. पण त्याहीपेक्षा  या ठिकाणी साचलेले  एक विलक्षण वेगळेपण, एक मंतरलेलेपण या भूमीने देशाला दिलेलं आहे असं मला नेहमीच वाटतं. साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, राजकारण अशा अनेक क्षेत्रात ते वेगळेपण व मंतरले

जागृती यात्रा भाग ९ : गाथा 'ग्रामविकासा'ची.

Image
      दक्षिणेतून ट्रेनने उत्तरेत शिरकाव केला. भौगोलिक बदलांनुसार साहजिकच वातावरणात गारवाही हळूहळू वाढत चालला होता. पहाटेच आम्ही ओरिसातील जगन्नाथपूर स्टेशनवर उतरलो. धुक्याने दाटलेल्या जगन्नाथपूरातून वाट काढत बसेसपर्यंत पोहोचलो. सर्व यात्रींना घेवून बसेसनी बहरामपूराकडे प्रयाण केले. बहरामपूरातील 'जो मडीएथ' यांच्या 'ग्रामविकास' या संस्थेला आज भेट द्यायची होती. ग्रामविकासमध्ये 'जो'चं भाषण, त्याच्याशी संवाद त्यानंतर दुपारचं जेवण व नंतर केस स्टडी असा एकदम भरगच्च कार्यक्रम होता. ग्रामविकासला पोचल्यानंतर लगेचच कार्यक्रमास सुरुवात झाली. 'जो' हा मूळचा केरळातल्या कांजीरपल्ली या गावचा. मद्रास विद्यापीठात शिकत असताना अभ्यासेतर कार्यक्रमांत आघाडीवर असलेला 'जो' मद्रास विद्यापीठाच्या स्टूडंटस् युनियनचा अध्यक्ष न बनेल तरच नवल. याच काळात 'जो'ने Young Students Movement for Development (YSMD) ची स्थापना केली. ७०चं दशक हे अस्वस्थतेचं दशक होतं. आफ्रिका, द.अमेरिका, व्हिएतनाम आदी ठिकाणी युवक चळवळींनी जोर पकडला होता. भारतातसुद्धा त्याची ठिणगी कुठे न कुठेतरी पडत

जागृती यात्रा भाग ८: 'नांदी' नव्या युगाची..

        ट्रेनमधील आजचा पाचवा दिवस. ट्रेनमधील एकूण वातावरणाला आता आम्ही चांगलेच सरावलो होतो. प्रेझेंटेशन, सेमिनार्स, ग्रुप अ‍ॅक्टीव्हीटिज, ट्रेनमधल्याच एका डब्यात जागृती स्टाफच्या अभिनव कल्पनेतून तयार झालेल्या कापडी बाथरूम्समध्ये होणारी आमची हलती अंघोळ इ.सगळ्या गोष्टींत जाम मजा यायची. सहकारी यात्रींबरोबर चांगली ओळख होऊ लागली होती. त्यांच्याकडूनसुद्धा बरंच काही शिकण्यासारखं होतं.संपूर्ण यात्रेत जेवढयाजणांना भेटता येईल तेवढ्यांना भेटत होतो, जे काही घेता येईल ते ते वेचत चाललो होतो. काही यात्री स्वत:च रोल मॉडेल्स असल्यासारखे होते. त्यांची माहिती समारोपाच्या ब्लॉगमध्ये देईनच.       तमिळनाडूतला प्रवास संपल्यानंतर आमची ट्रेन आंध्राकडे निघाली. आंध्रपदेशसुद्धा तमिळनाडूसारखंच. तशीच वनराई, मोकळं रान व चरणारी गुरे. तुलनेतला वेगळेपणा म्हटलं तर इथे असलेल्या शंकूच्या आकाराच्या राहुट्या. खिडकीतून दुरून साजरे दिसणारे अचल डोंगर एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखे दिसत होते. इथंली सुंदर वृक्षराजी मनात व्यापून जाते व नकळत हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवून जाते. भव्य गोदावरी नदी पाहिल्यावर 'ना. धों.'ची  &quo

जागृती यात्रा भाग ७ : खेडयाकडे चला...?

Image
         मदुराईपासून खरं तर चेन्नई अवघ्या काही तासांच्या अंतरावर. पण ट्रेनचा वेग कमी असल्याने दुपारी बारानंतर आम्ही चेन्नईत पोहोचलो. चेन्नईमध्ये परतीच्या मान्सूनची भीती होतीच. ती खरी ठरली. ऐन हिवाळ्यातसुद्धा तिथं हलकासा पाऊस पडत होता. दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास आम्ही चेन्नईतील 'कांचीपूरम' स्टेशनवर उतरलो. स्टेशनबाहेर कुठेही 'जागृती'च्या बसेस नव्हत्या. त्याचं कारण आजची भेट मुळी धावतीच नव्हती. सर्व यात्रींना स्टेशनपासून जवळच असलेल्या एका ठिकाणी जायच्या सूचना दिल्या गेल्या. स्वयंसेवकांच्या दिशादर्शनानुसार आम्ही सर्व यात्री सुमारे एक किलोमीटरभर चालत एका जुन्या इमारतीत गेलो. ही इमारत म्हणजे कोणतेही कार्यालय नव्हते की कोणतीही कंपनी. आज ज्या संस्थेला-'ट्रॅव्हल अनादर इंडिया' (TAI) ला आम्ही भेट देणार होतो त्यांचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. हॉल साधाच होता. बसण्यासाठी फक्त कार्पेटची सोय केली होती, ज्यावर फक्त अर्धेच यात्री मावू शकले. राहिलेल्यांच्या कार्पेट नाहीय, आवाज नीट ऐकू येत नाही इत्यादी कुरबुरी सुरु झाल्यात. मात्र, लगेचच कार्यक्रमाला सुरुवात झाली.