Posts

Showing posts from 2010

‘उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती कार्यक्रम २०११ ’

         उन्हाळी संशोधन पाठ्यवृत्ती (Summer Research Fellowship) ही भारत सरकारच्या विज्ञानातील तीन अग्रगण्य संस्था अनुक्रमे  इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी, नवी दिल्ली व नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद यांच्याकडून दरवर्षी देण्यात येते.  ही पाठ्यवृत्ती हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना उन्हाळी प्रकल्पासाठी देण्यात येते. या पाठ्यवृत्ती चा कालावधी दोन महिन्यांचा असतो. विद्यार्थी-शिक्षकांच्या सोयीसाठी हे प्रकल्प उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पूर्ण करता यावेत अशी योजना असते. २०११ मधील या  पाठ्यवृत्ती साठी विज्ञान शाखेतील विविध विषयांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पार्श्वभूमी:                उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढा वी हा या पाठ्यवृत्तीमागील  प्रमुख उद्देश आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी मार्च २००७ पर्यंत ही पाठ्यवृत्ती फक्त इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, बंगलोर यांच्या कडून देण्यात येत होती. त्यानंतर मात्र २००७ मध्ये विज्ञानातील  अजून दोन प्रमुख

एका खेळीयाने ...

बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयमच्या इतिहासात रविवार, दि.१० ऑक्टोबर २०१० (१०/१०/१०) हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला असेल. रविवारी सचिनने कसोटीतल्या १४००० धावा पूर्ण केल्या व भारतीय  क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा रोवला. चौकार मारून सचिनने चौदा हजारावी धाव जमवली आणि अख्खं स्टेडीयम त्याला मानवंदना (Standing Ovation) देण्यासाठी उभं राहिलं, तो  क्षण अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा होता. चक्क रिकी पॉनटिंगने सुद्धा सचिनचं अभिनंदन  करावं यातंच सारं आलं. सचिनच्या कसोटीतल्या चौदा हजार धावा असोत किंवा एकदिवसीय – कसोटीतल्या  दोन्ही मिळून त्याच्या पंचवीस हजार धावा असोत अथवा त्याचे शतक-अर्धशतकाचे विक्रम असोत; सचिनची क्रिकेटमधली आकडेवारी व विक्रम यांचं नवल आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. सचिन नुसता   मैदानावर सामना जरी खेळायला आला तरी तो एक नवीन विक्रम होऊन जातो. सचिनची मैदानावरची  फक्त उपस्थिती ही भारतीय संघाला व करोडो भारतीयांना केवढा मोठा दिलासा असतो हे साऱ्या नाच  माहिती आहे. सचिनची खिलाडू वृत्ती फक्त क्रिकेटच नव्हे तर क्रीडा जगतातील सर्व खेळाडूंनी आदर्श  ठेवावी अशी आहे. सचिनचा फिट

मिसकॉल..

माझे आवडते व जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची जाहीर माफी मागून... पाडगावकरांची  एक सुंदर व प्रसिद्ध कविता 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे असतं.. ' ह्या कवितेचं चुकत-माखत विडंबन करण्याचा  प्रयत्न केलेला आहे. तसा विडंबनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न...काही चूक-भूल असेल तर कृपया माफ करावं.   मिसकॉल.. मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो, तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो! काय म्हणता? मिसकॉल हा एक त्रास असतो? कॉल करण्यासाठी दिलेला तो सिग्नल असतो? आणि परत कॉल केल्यावर आपला खर्च वाढणार असतो? असला तर असू दे, वाढला तर वाढू दे! तरीसुद्धा तरीसुद्धा, मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो, तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो! नेहमी जमा खर्चाचाच हिशोब मांडणाऱ्या मंडळीना मिसकॉलचे महत्व काय कळणार? कॅन्टीन मध्ये मैत्रिणीला बोलवण्यासाठी मिसकॉल देता येतो, पऱ्याक्टीकलला लेट होणाराय हे सांगण्यासाठी मिसकॉल देता येतो; लेक्चर सुरु झालंय, पटकन ये हे बजावण्यासाठी मिसकॉल देता येतो; एवढंच काय, या पुढचं लेक्चर बंक करू हे सांगण्यासाठी अगदी चालू लेक्चर मध्ये सुद्धा मिसकॉल दे

उत्तरे

प्रश्न गुंतागुंतीचे बनत चालले आहेत, त्याची उत्तरे कशी शोधू आता ?  असं नेहमीच वाटतं. पण परमेश्वरा नेहमी तूच मदत करतोस, त्या प्रश्नांची अनोखी उत्तरे तुझ्या भाषेत देऊन. कदाचित त्यावेळेपुरता तूच माणसात अवतरत असावास, ती उत्तरे शोधण्यासाठी, अन लुप्त होत असावास माणसातून, एकदाची उत्तरे सापडल्यावर. म्हणूनच तर जे जे उत्तम, उदात्त व चांगले ते ते सर्व तू माणसात अवतरल्यावर होत असावे, अन राहिलेलं सगळं मात्र माणूस स्वत: करतो, तुझा अंश त्यावेळी त्याच्यात नसताना. व त्या वाईट गोष्टींचे खापर मात्र तो फोडतो तुझ्यावर. पण हे परमेश्वरा तुझ्याशिवाय कोण सांभाळेल तुझ्या या लेकराला - या माणसाला ? अन म्हणूनच तू म्हणतोस की '' क्षमा कर त्यांना. त्यांना हे कळत नाही की ते काय करताहेत "

ब्लॉंगायन...?

         आज बऱ्याच दिवसांनी माझं ब्लॉंगायन परत एकदाचं सुरु होतयं. मध्यंतरी कामाच्या व्यस्ततेमुळे ब्लॉगकडे ढुंकूनही बघता आले नाही आणि याची दररोज मनात खंतदेखील असायची. मध्यंतरीच्या या काळात प्रवासही भरपूर झाला, मनासारख्या व मनाविरुद्ध घटनाही अनेक घडल्या. त्यामुळे ब्लॉगसाठी बरेचसे विषय मनात दाटले होते पण मोकळा वेळ व कामाचा व्यस्तपणा हे यावेळी एकमेकांच्या व्यस्त मात्रेत ( inversaly proportional to each other ) होते. त्यामुळे मनातले ब्लॉग मनातच राहिले. भिरभिर पडणारा पाऊस, 'पीएमटी'तली गर्दी व त्यातली भांडणे, पावसातला चहा व गरम भजी, नुकताच सुरु होणारा श्रावण, पांढरा व तांबडा रस्सा, 'सिम्बी'चे थेऊर प्रकरण असे एक ना अनेक विषय, उद्या-परवा कधीतरी ब्लॉग लिहू म्हणून डायरीत टिपून ठेवत होतो. त्यातच 'महेंद्र'जींच्या एका पूर्वीच्या ब्लॉगवरील 'ब्लॉगरने आठवड्यात कमीत कमी चार ब्लॉग तरी लिहावेत' ही सूचना सारखी आठवायची पण ब्लॉग न लिहिणं व स्वत:च्या आळशीपणाची लाज वाटणं याखेरीज काहीही करत नव्हतो. आज शेवटी त्या निर्लज्जपणाचीच थोडीशी लाज वाटली व काहीतरी लिहायचं म्हणून पेन हाती घे

ई-अंधश्रद्धा

काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा मेल आला होता. त्यात साईबाबांचे चित्र होते व खाली लिहिले होते की हा मेसेज अमुक-अमुक जणांना पाठवा, तेवढया जणांना पाठवला की येत्या दहा दिवसांत तुमची इच्छा  पूर्ण होईल आणि जर मेसेज नाही पाठवला तर येत्या २४ तासांत तुम्हाला एखादी वाईट घटना कळेल. मेल वरून कळंत होतं की तो बराच फिरून आलाय (म्हणजे बरेच बकरे बळी पडलेत ). काय गंमत आहे ना ? आपण एकविसाव्या शतकात, विज्ञान युगात  वगैरे जगतो, इंटरनेटच्या युगात राहतो वगैरे, वगैरे पण युवा व उच्चशिक्षित असलो म्हणून काय झालं, लादून  घेतलेल्या अनेक कल्पना मात्र अगदी जशाच्या तशा जगतो. अंधश्रद्धा ही त्यापैकीच एक, फक्त स्वरूप बदलले. पूर्वी काही लोकं ठराविक मायन्याची पत्रं पाठवायचीत की हे पत्र अजून एकवीस जणांना पाठवा. मग पाठवले तर..., नाही  पाठवले तर... तोच प्रकार. फक्त तो पत्रप्रकार आता इंटरनेट वर आला एवढंच. चक्क इंटरनेट वर सुद्धा हे अशा प्रकारचे  ई-अंधश्रद्धेचे नमुने बघितले की मग मात्र  आपल्या मागासलेपणाची  खात्रीच होते. ( मोबाईलवर सुद्धा हा प्रकार सर्रास सुरु आहे. ) असे मेल्स आपल्याला भावनिक बळी पाडतात व आपल्याच  नकळत आप

"Goa is Beautiful in Rains...!!"

             विलोभनीय निसर्ग सौंदर्याची देणगी व सोबतीला देखण्या समुद्रकिनाऱ्यांची सुंदर साथ म्हणजे गोवा ! गोव्यावर सौंदर्याची उधळण  करताना परमेश्वरानं कदाचित एकही हातचा स्वतःकडे ठेवलेला नसावा. गोवा  बघताना मन नकळत कुठेतरी हरवून जातं. गोव्यातल्या सौंदर्याला सुरुवात आहे, शेवट मात्र नाही. जिथं जाऊ, तिथं सौंदर्य...! निसर्ग सौंदर्य आपली पाठ इथं सोडतंच नाही असं वाटंत राहतं. गोव्यात आलं की आपलं कुतूहल जागृत होतं. आपल्याच नकळत आपण लहान मुलासारखे ' जिज्ञासू ' बनून जातो. मग कधीतरी संध्याकाळी एकटेच ' मिरामार ' सारख्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर बसलो असता अनेक प्रश्न मनामध्ये रुंजी घालू लागतात; किंवा भूतकाळातले  सोनेरी क्षण समुद्राच्या लाटांसारखे मन:चक्षु समोर गर्दी करतात. इथलं शांत, सुंदर जीवन मनाला भावतं आणि कधी आपण गोव्याच्या प्रेमात पडतो हे आपल्या लक्षातच येत नाही.                        गोव्यातलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथला सायंकाळचा ' सूर्यास्त '. इथल्या सायंकाळच्या सूर्यास्तावर पर्यटक किती फिदा असतात हे तर सर्वज्ञात आहे. समुद्रकिनाऱ्यावरचा हा ' सूर्यास्त

चावीप्रवास

                                Blog चं  title वाचून धक्का बसला असेल नां? तुम्हाला कदाचित असं सुद्धा वाटलं असेल की ही कोणती उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त एस.टी. महा-मंडळाने सुरु केलेली एखादी नविन प्रवास योजना आहे की काय ? आणि प्रवासात 'चावी'चा काय संबंध ? मग 'चावी' घेउन प्रवास करायचा की काय ? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.पण असं काहीही नाहीये. 'चावीप्रवास' हा खरं तर मी माझ्या पुरत्या तयार केलेल्या  dictionary मधला एक शब्द आहे. गेल्या आठवड्यात  माझ्या रुमची चावी हरवली व ती मी कशी शोधली,शोधताना माझी झालेली अवस्था, हे सारं म्हणजे माझा ' चावीप्रवास '.                        ही घटना आहे माझ्या सध्याच्या  गोव्यातील National Institute of  Oceanography (NIO) च्या stay मधली. शुक्रवारी संध्याकाळी  Lab. मधून थकून NIO कॉलनीकडे परत येत होतो, मात्र उद्या आणि परवा वीक-एण्ड या कल्पनेने जरा बरं वाटत होतं. रात्री मग मित्र  मंडळी बरोबर निवांत गप्पा मारत जेवत असताना ठरलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी जवळच्या बीच वर जायचं. आमच्यापासून  दिडेक किलोमी

दार उघड...

                            आपल्या प्रत्येकाच्या दररोजच्या जगण्यात सुख-दुःखाचे अनेक क्षण येत (व जातसुद्धा) असतात. जसं सुख-दुखाचं तसंच आशा-निराशेचं. Student's life मध्ये तर हे 'फ्रस्ट्रेशन ' जरा जास्तच असतं व ते सुद्धा अगदी छोट्या- छोट्या गोष्टींचं. Exam मध्ये backlog राहिला,  xxx नं चक्क नकार दिला, ह्याला  Practical ला जास्त मार्क्स दिलेत, त्या सरांनी Partiality केली, असे एक ना अनेक प्रश्न ! नेहमी आपण अगदी कॅजुएली म्हणतोच  की  Life म्हणजे हे सगळं चालायचंच ! पण एवढ्या कॅजुएली मात्र आपण सगळ्या प्रश्नांना response  देत नसतो.दुःखाची अथवा निराशेची एखादी वेळ आली की naturally आपले अवसान गळून जाते.मात्र अशा वेळी थांबुनदेखील चालंत नसतं.कारण जग आपल्यासाठी थांबत नसतं.मग त्या समस्येवरती काही ना काही तरी उपाय शोधावा लागतो. उपाय शोधणं ही नंतरची activity आहे, पण त्याच्या पूर्वीच आपल्याला ' स्व:ताला mentally प्रिपेअर ' करावं लागतं, recharged  होण्यासाठी.  हे असे प्रिपेअर करण्याचे (वा recharged  होण्याचे ) अनेक मार्ग आहेत- शांतपणे तासनतास गाणी ऐकणं, Motivational Videos बघणं, Ins

उन्हाळ्याची सुट्टी........" आठवणीतली."

              गेल्या काही  दिवसांपूर्वीच  B.Sc.ची Exam  संपली. आमचे सगळ्यांचे  Supervision सुद्धा संपले होते. ज्या सुट्टीची एवढे दिवस वाट पाहत होतो ती उन्हाळ्याची सुट्टी एकदाची सुरु झाली. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, माझं मन बालपणातल्या उन्हाळ्याची सुट्टीभोवती पिंगा घालू लागतं. एखाद्या जीर्ण वस्त्रातले एकेक धागे जसे बाहेर यावेत तशा एकेक जुन्या आठवणी जाग्या होऊ  लागतात.                               कोल्हापुर जिल्ह्यातालं ' चरण' हे माझं गाव. साधारण १९९४-९५  चा काळ. सगळीकडं जागतिकीकरण सुरु  होऊन  नुकताच काही काळ लोटलेला. त्यावेळी आमच्या चरणाला अजून जागतिकीकरणाची  झळ लागायची होती. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आम्हा बाल- मंडळीसाठी धम्माल  असायची . सगळी आतेभावंडं उन्हाळ्याची सुट्टी साठी  आजोळी म्हणजे आमच्या घरी आलेली असायची. मग आजी आमच्यापेक्षा त्यांचे खुप लाड करायची, (कारण लेकीची मुलं ना!). घरी असलेले आंबे,काजू,फणसाचे गरे पहिल्यांदा त्यांना द्यायची व मग आम्हाला. त्यावेळी आमच्या शेतात आंब्याची भरपूर झाडे होती. जवळपास  सगळी झाडे आंब्यांनी लदाडलेली असायची. आई सुद्धा लोणच्याच्या