Posts

Showing posts from March, 2012

जागृती यात्रा भाग ११: हरितप्रदेशातून..

     खिडकीतून बघताना चोहीकडे सगळं कसं हिरवंगार दिसत होतं. मनाने अलवारसा कौल दिला 'उत्तरप्रदेश' आलं. मुबलक पाणी, सुपिक मृदा आणि आपल्याकडे नसते तशी लांबसडक शेती - 'हरितप्रदेश' व्याख्येला या तीन गोष्टी पुरेशा आहेत. उत्तरप्रदेशात पूर्वांचल या नावाने प्रसिद्ध असणा ऱ्या  प्रादेशिक विभागातलं देवरिया हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे. देवरियाची विशेष अशी काहीच ओळख नाही पण 'जागृती यात्रा' राबवणाऱ्या जागृती सेवा संस्थानचं हे माहेरघर. देवरियापासून तासाभराच्या अंतरावर असलेलं 'बरपार' हे शशांक मणी (जागृतीचे संचालक) यांचं गाव. स्टेशनवर उतरताच देवरियात 'जागृती'चं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत झालं. तिथून मग लगेच आम्ही बरपारकडे पोहोचते झालो. अगोदर ठरल्याप्रमाणे 'बिझग्यान वृक्ष' (Bizgyan Tree) या स्वाध्यायासाठी आम्हाला बरपार व आसपासची दोन-तीन गावे पालथी घालायची होती. सर्व संघ मग एकत्र जमले. बिझग्यान ही स्वाध्यायाबरोबरच एकमेकांमध्ये स्पर्धाही असल्याने प्रत्येक संघ आपापली व्यूहरचना रचायच्या तयारीला लागला. गावे छोटी-छोटी व जवळ असल्याने एकदम तीन चार गावांच

जागृती यात्रा भाग १० : बिहारचं 'निदान'

Image
     ३१ डिसेंबर ट्रेनमध्ये साजरा करणे ह्यात वेगळं काहीही नाही. पण नववर्षारंभाचा डान्स ट्रेनमध्ये करणं हा पूर्णपणे नवा अनुभव आमच्यापैकी प्रत्येकजण अनुभवत होता. नवीन वर्ष असल्याने म्हणा किंवा शेड्युलमध्ये असल्याने म्हणा १ जानेवारीला आम्हाला सुट्टी दिली होती. त्या दिवशी ट्रेनमध्ये मात्र विविध सेशन आयोजित केले होते. ट्रेनने अजून ओरिसा सोडलं नव्हतं. ओरिसाच्या सीमेजवळ  कुठेतरी आम्ही होतो. डायरीमध्ये मी काहीतरी टिपत बसलो होतो. साधारणत: दुपारच्या सुमारास ओरिसाची सीमा संपवून पश्चिम बंगालमध्ये आम्ही प्रवेश केला. डायरी तशीच ठेवून मी खिडकी पकडली. बंगभूमी..! रवींद्रनाथ टागोरांची भूमी, विवेकानंदाची भूमी, सुभाषबाबूंची भूमी, सत्यजित रेंची भूमी, कम्युनिस्टांची भूमी. बंगाल या प्रांताबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे. या भूमीने देशाला अनेक बुद्धिवंत माणके दिलेली आहेत हे तर सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहेच. पण त्याहीपेक्षा  या ठिकाणी साचलेले  एक विलक्षण वेगळेपण, एक मंतरलेलेपण या भूमीने देशाला दिलेलं आहे असं मला नेहमीच वाटतं. साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, राजकारण अशा अनेक क्षेत्रात ते वेगळेपण व मंतरले