काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता. पूर्ण मेल गांधीजींबद्दल होता. मेल वाचला. त्यात पाकिस्तानला दिले गेलेले पंचावन्न कोटी, फाळणीच्या वेळचा गांधीजींचा नौखाली दौरा, त्याच वेळी सीमेवर होत असलेला रक्तपात व भीषण अत्याचार इत्यादी अनेक गोष्टींना गांधीजींना जबाबदार धरण्यात आले होते व त्यामध्ये गोडसेचा गोडवा गायला होता. मेलमध्ये गांधीजींच्या बाबतीत बरचंस गरळ ओकणारं काहीसं लिहिलं होतं. गांधीजींवर हे असे बिनबुडाचे आरोप करुन आपला मूर्खपणा व मनाचा कोतेपणा जगजाहीर करणार्यांचं मला खुप हसु येतं. एकूण काय, गांधीजींवरील या व अशा स्वरुपाच्या इतर आरोपांचे खंडण करण्यासाठी हा ब्लॊग नक्कीच लिहिलेला नाही. कारण खंडणमंडण करण्यामध्ये फक्त वेळ जातो. त्यातून साध्य तर काहीच होत नाही. मी माझ्या साऱ्या वाचन-चिंतन प्रवासात मला उलगडलेले गांधीजी इथे मांडले आहेत. वाचन तर लहानपणापासून होतंच पण कॉलेजला आल्यावर मात्र त्याची व्याप्ती वाढली. त्यात मग वाचन, चर्चा, व्याख्यानं, चिंतन इ. ची भर पडली. ’राजाराम’ कॉलेजला असताना असल्या (वर उल्लेखलेल्या) व तत्सम विषयांवर आमच्या अक्षरशः चर्च
माझे आवडते व जेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची जाहीर माफी मागून... पाडगावकरांची एक सुंदर व प्रसिद्ध कविता 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे असतं.. ' ह्या कवितेचं चुकत-माखत विडंबन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा विडंबनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न...काही चूक-भूल असेल तर कृपया माफ करावं. मिसकॉल.. मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो, तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो! काय म्हणता? मिसकॉल हा एक त्रास असतो? कॉल करण्यासाठी दिलेला तो सिग्नल असतो? आणि परत कॉल केल्यावर आपला खर्च वाढणार असतो? असला तर असू दे, वाढला तर वाढू दे! तरीसुद्धा तरीसुद्धा, मिसकॉल हा, मिसकॉल हा, मिसकॉल असतो, तुम्हाला आणि आम्हाला तो कधीतरी येतच असतो! नेहमी जमा खर्चाचाच हिशोब मांडणाऱ्या मंडळीना मिसकॉलचे महत्व काय कळणार? कॅन्टीन मध्ये मैत्रिणीला बोलवण्यासाठी मिसकॉल देता येतो, पऱ्याक्टीकलला लेट होणाराय हे सांगण्यासाठी मिसकॉल देता येतो; लेक्चर सुरु झालंय, पटकन ये हे बजावण्यासाठी मिसकॉल देता येतो; एवढंच काय, या पुढचं लेक्चर बंक करू हे सांगण्यासाठी अगदी चालू लेक्चर मध्ये सुद्धा मिसकॉल दे
२०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल... यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता , अस्सल साहित्यरसिक , कृष्णाकाठचा सह्यकडा , युगपुरुष , हिमालयाची ढाल , किर्तीवंत वगैरे , वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव... आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून
Comments
Post a Comment