काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता. पूर्ण मेल गांधीजींबद्दल होता. मेल वाचला. त्यात पाकिस्तानला दिले गेलेले पंचावन्न कोटी, फाळणीच्या वेळचा गांधीजींचा नौखाली दौरा, त्याच वेळी सीमेवर होत असलेला रक्तपात व भीषण अत्याचार इत्यादी अनेक गोष्टींना गांधीजींना जबाबदार धरण्यात आले होते व त्यामध्ये गोडसेचा गोडवा गायला होता. मेलमध्ये गांधीजींच्या बाबतीत बरचंस गरळ ओकणारं काहीसं लिहिलं होतं. गांधीजींवर हे असे बिनबुडाचे आरोप करुन आपला मूर्खपणा व मनाचा कोतेपणा जगजाहीर करणार्यांचं मला खुप हसु येतं. एकूण काय, गांधीजींवरील या व अशा स्वरुपाच्या इतर आरोपांचे खंडण करण्यासाठी हा ब्लॊग नक्कीच लिहिलेला नाही. कारण खंडणमंडण करण्यामध्ये फक्त वेळ जातो. त्यातून साध्य तर काहीच होत नाही. मी माझ्या साऱ्या वाचन-चिंतन प्रवासात मला उलगडलेले गांधीजी इथे मांडले आहेत. वाचन तर लहानपणापासून होतंच पण कॉलेजला आल्यावर मात्र त्याची व्याप्ती वाढली. त्यात मग वाचन, चर्चा, व्याख्यानं, चिंतन इ. ची भर पडली. ’राजाराम’ कॉलेजला असताना असल्या (वर उल्लेखलेल्या) व तत्सम विषयांवर आमच्या अक्षरशः चर्च
२०१२-१३ हे यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हिमालयाएवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या या मराठी माणसाबद्दल... यशवंतरावांवर लेख लिहायला सुरुवात केली तेव्हा या लेखाला शीर्षक म्हणून कोणतं नाव शोभेल याची चाचपणी मनातल्या मनात करू लागलो. मग एकापेक्षा एक सरस अशी विशेषणं यशवंतरावांसाठी सुचू लागली. महाराष्ट्राचा महानेता , अस्सल साहित्यरसिक , कृष्णाकाठचा सह्यकडा , युगपुरुष , हिमालयाची ढाल , किर्तीवंत वगैरे , वगैरे. पण कोणत्याच शीर्षकावर एकमत होईना. मग ठरवलं की आधी अख्खा लेख लिहून काढायचा व शेवटी त्यातलं समर्पक विशेषण शीर्षकासाठी निवडायचं. दररोज थोडं-थोडं वाचन जवळपास पंधराएक दिवस करत होतो. या पंधरा दिवसांत हळूहळू यशवंतराव उलगडू लागले आणि मग क़ळत गेलं की यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वच एवढं व्यामिश्र व विविधांगी पैलूंच होतं की त्यांना कोणत्याही एका विशेषणानं संबोधणं हा त्यांच्या बहुपेडी व समृद्ध व्यक्तिमत्त्वावर एक प्रकारे अन्यायच ठरला असता. काल एकदाचा लेख लिहून पूर्ण झाला. उरली ती कागदावर थोडीशी जागा नि मनात यशवंतराव... आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून
दिल्लीच्या IGIB (Institute of Genomics and Integrative Biology) त मायाक्रोबायोलोजीमध्ये पीएचडी करणारा नीरज भट. नीरज मूळचा गुजरातमधल्या उनाचा. IGIB त पीएचडीच्या सुरुवातीच्या काळात एका विषयात आवड नाही म्हणून पीएचडीचा विषय बदलला. असं चार-पाच वेळा झालं. पाचवेळा गाईड बदलले म्हणून IGIB त त्याला 'द्रौपदी' म्हणून चिडवताहेत. तो राहतो तिथून जवळच असलेल्या तिमारपूरच्या झोपडपट् टीतील मुलांना दररोज दोन तास शिकवायला तो जातो. गुजरात मध्ये असताना देखील तिथल्या डांग व दहाड जिल्ह्यातील आदिवासींना 'मश्रूम कल्टीवेशन ट्रेनिंग ' देणाऱ्या टीम मध्ये हा असायचा. आदिवासींना कमी श्रमात व बारमाही पोषक अन्न मिळावे यासाठी मश्रूम, ही याच्याच सुपीक डोक्यातून निघालेली आयडिया! पीएचडी नंतर ग्रामीण विकासासाठी त्याला स्वत:ला वाहून घ्यायचंय. पुण्याजवळच्या पाबळचा दीपक आडक. पाबळ मधल्या विज्ञान आश्रमात तो अकाऊटंट आहे. पाबळचा विज्ञान आश्रम शालेय शिक्षणामध्ये अनुत्तीर्ण झालेल् या मुलांना मोफत विज्ञान-तंत् रज्ञान शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत करते. आश्रमाच्या
Comments
Post a Comment