Posts

Showing posts from 2011

अण्णा हजारेंना पत्र.

अण्णांना,       खरं सांगू अण्णा, चांगदेवाला तो ज्ञानदेवापेक्षा वयाने मोठा असूनही ज्ञानदेवाला पत्र लिहिताना कोणत्या वचनाने लिहावे असा प्रश्न पडला होता. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असूनही मला तो पडलेला नाही. कारण आदरणीय म्हणावे असे तुम्ही नाही आहात,एवढं मात्र खरं.        अलीकडील तुमची बरीचशी विधाने ही अनेकांना बेदरकार वाटताहेत मात्र आम्हाला तुमच्या (अ)संयमाची माहिती असल्याने त्यात काहीही विशेष वाटले नाही. तुमचा बेतालपणा व फटकळ बोलणं ह्यामुळे तुम्ही स्वत:च्याच लोकपाल आंदोलनाची हवा घालवलेली आहे हे सगळ्यांना आता कळून चुकले आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर हल्ला झाला आणि तुम्हाला हे कळताच पटकन तुमच्या तोंडातून बाहेर पडलेल्या "एकही मारा" या शब्दांनी तुम्ही तुमच्या खऱ्या अंतरंगाचे दर्शन साऱ्या भारताला घडवले. काही वेळानंतर तुम्हाला तुमची चूक लक्षात आल्यानंतर आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ मिडीयाने घेतला अशी सारवासारव करू लागला व हा हल्ला पवारांवर नाही तर लोकशाहीवर आहे अशी टोटल 'बेदी'छाप वाक्ये फेकू लागला. हे सारं पाहिल्यानंतर तुमच्यावर ओढवलेल्य

उद्योगविश्वातला तारा..

              कुठेतरी वाचनात उपनिषदांचा संदर्भ आला होता. उपनिषदांमधलं एक संस्कृत वचन तिथे दिलं होतं. ते वचन नेमकं आता आठवत नाही. मात्र अर्थ लक्षात आहे. अर्थ असा होता "सज्जनाला नेहमी दुर्बलतेचा शाप असतो व समर्थला दुर्जनेतच वरदान असतं." मग पुढे लेखकाने सज्जन हे चारित्र्यवान असतात पण समाजात घडण्याऱ्या अपप्रवृत्तींविरुद्ध लढण्यासाठी कमी पडतात किंवा अनेकदा दुर्बल ठरतात. तर जो हे सगळं करू शकेल तो 'समर्थ', दुर्दैवाने ब ऱ्या चदा दुर्जन कसा असतो हे मार्मिकपणे पटवून दिले होते. तसेच, शेवटी तुम्ही 'समर्थ सज्जन' बना असा गोड संदेशही दिला होता आणि मूल्यांचं   महत्व  अधोरेखित केलं होतं. हे आठवण्याचं कारण एवढंच, की मानवी मुल्ये व नैतिकतेचा हळूहळू ऱ्हास होत असलेल्या या ढासळत्या युगातही या मूल्यांना केंद्रबिंदू मानून जगणारी काही माणसं अथवा संस्था अजून आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांना "समर्थ सज्जन" म्हणावं अशी चारित्र्यवान व कार्यक्षम माणसं, अशा संस्था. टाटा उद्योगसमूह हा त्यापैकीच एक. टाटा उद्योगसमूह हा फक्त उद्योगसमूह कधीच नव्हता तर स्वच्छ  कारभार, सामाजिक

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग २ ( ऋतुचक्र )

               दुर्गाबाईंचं लिहिणं हा कौतुकाचा नसून चिंतनाचा विषय आहे. बाईंचं लेखन थोडं नीट न्याहाळून बघितलं तर कळतं की बाईंमधल्या लेखिकेवर त्यांच्यातल्या कवयित्रीने मात केलेली आहे. बाई खरंतर कवयित्रीच व्हायच्या, पण चुकून लेखिका झाल्या. त्यामुळेच बाईंच्या लेखनात शब्दांचा ’नाद’ लक्ष वेधून घेतो. ’ऋतुचक्र’ मध्ये हा शब्दनाद प्रकर्षाने आढळतो. ऋतुचक्र हा बाईंच्या सर्व लेखनपसारयातला सुंदर असा मोरपीस आहे. बाईंचं कोणतंही पुस्तक असो, ऋतुचक्र असो वा भावमुद्रा असो किंवा दुपानी असो, त्यांचं निसर्गाशी जडलेलं नातं बाई हळूच खुलवत नेतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पालथे घातलेले डोंगर, दऱ्या,नद्या,नाले, अनेक उपनद्या,ओढे, ओहोळ या सा ऱ्या प्राकृतिक घटकांपासून ते मग अगदी त्यांच्याशी   संबंधित असलेल्या ऋतु व त्यांचे चक्र,त्याचे समाजजीवनावर व अन्य नैसर्गिक घटकांवर उदा. प्राणी, पक्षी इ.वर होणारे परिणाम ह्या सगळ्यांचं वर्णन ओघानं आलंच. फक्त ऋतुचक्र’ वर जरी लिहायचं म्हटलं तरी वहीची कितीतरी पाने भरून जावीत एवढं लिहिता येईल. साधं ऋतुचक्रच्या मलपृष्ठवरचे वर्णन पाहा. " ऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्

एक प्रयत्न -गांधीजींना उलगडण्याचा.

        काही दिवसांपूर्वी एक मेल आला होता. पूर्ण मेल गांधीजींबद्दल होता. मेल वाचला. त्यात पाकिस्तानला दिले गेलेले पंचावन्न कोटी, फाळणीच्या वेळचा गांधीजींचा नौखाली दौरा, त्याच वेळी सीमेवर होत असलेला रक्तपात व भीषण अत्याचार इत्यादी अनेक गोष्टींना गांधीजींना जबाबदार धरण्यात आले होते व त्यामध्ये गोडसेचा गोडवा गायला होता. मेलमध्ये गांधीजींच्या बाबतीत बरचंस गरळ ओकणारं काहीसं लिहिलं होतं. गांधीजींवर हे असे बिनबुडाचे आरोप करुन आपला मूर्खपणा व मनाचा कोतेपणा जगजाहीर करणार्यांचं मला खुप हसु येतं. एकूण काय, गांधीजींवरील या व अशा स्वरुपाच्या इतर आरोपांचे खंडण करण्यासाठी हा ब्लॊग नक्कीच लिहिलेला नाही. कारण खंडणमंडण करण्यामध्ये फक्त वेळ जातो. त्यातून साध्य तर काहीच होत नाही. मी माझ्या साऱ्या वाचन-चिंतन प्रवासात मला उलगडलेले गांधीजी इथे मांडले आहेत.                 वाचन तर लहानपणापासून होतंच पण कॉलेजला आल्यावर मात्र त्याची व्याप्ती वाढली. त्यात मग वाचन, चर्चा, व्याख्यानं, चिंतन इ. ची भर पडली.  ’राजाराम’ कॉलेजला असताना असल्या (वर उल्लेखलेल्या) व तत्सम विषयांवर आमच्या अक्षरशः चर्च

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग १

                सध्या दुर्गा भागवतांचं ' भावमुद्रा ' नावाचं पुस्तक वाचतोय. ' भावमुद्रा ' मध्ये  दुर्गाबाईंच्या काही निवडक लघु निबंधांचा समावेश आहे. दुर्गाबाईंच्या एकूण साहित्यावर एक ओझरती नजर जरी टाकली तरी आपल्या लक्षात येते की, बाई निसर्गवेड्या आहेत. त्यांच्या निसर्गप्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांचं ' ऋतुचक्र '. 'ऋतुचक्र' ने दुर्गाबाईंना तमाम मराठी वाचनवेड्या रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलेलं आहे. दुर्गाबाईंबद्दल बोलायचं अथवा लिहायचं  म्हटलं तर निसर्गाचा उल्लेख ओघानंच येतो. निसर्गावर दुर्गाबाईंनी अतोनात प्रेम केले. फक्त निसर्गावरच नव्हे तर निसर्गातल्या प्रत्येक पशु-पक्षी, जीव-जंतुंवरती त्यांनी प्रेम केलं. निसर्गाचं, सृष्टीचं दर्शन त्यांनी अगदी डोळे भरून घेतलेलं आहे. त्यातल्या पशु-पक्ष्यांचं व छोट्या जीव-जंतुंचं  जीणं बाईंनी लहान मुलाच्या डोळस कुतूहलानं टिपलेलं आहे. पशु-पक्ष्यांच्या, जीव-जंतुंच्या बारीक-सारीक हालचालींचा अभ्यास त्यांनी अगदी निरागसपणे केलेला आहे. त्यामुळेच दुर्गाबाई फक्त मोठे पशु-पक्षीच नव्हे तर फुलपाखरू,

प्रेमात तुझ्या मी...

प्रेमात तुझ्या मी माझ्यात नकळत पडलो, कळले न कसे मला, मी मजला कधी विसरलो. सौंदर्य नितळ तुझे हे असे मन धुंद वेडे होई जसे, सांगू तुला मी आता कसे पाहता तुजला मला काय भासे. केशसंभार तुझा जेव्हा तू हळूच सावरशी , हाय! हृदयातून तेव्हा सुप्त ज्वाला पेटवीशी. निशा तुझ्या केसांमधली अंधारी ही अशी, सांजेला त्यात उगवण्यासाठी वेडा होई शशी. लोचनांच्या तुझ्या त्या लडिवाळ हरकती एकांतात असलो की अजूनही आठवती. चंचल नयन तुझे, कधीतरी नजरानजर होई, अन नकळत तनी माझ्या वीज चमकून जाई. ओठ तुझे ते गुलाबी-कोमल, फुलांच्या पाकळ्या जणू चुम्बुनी घ्यावे अन विलग करावे ओले दव कणु. अधर नव्हेत, हे तर आसुसलेले क्षण गं बावरी ! कवेत ये आता माझ्या, मला मोह न आवरी.                                                   - प्रथमेश आडविलकर.