Posts

Showing posts from January, 2012

जागृती यात्रा भाग ५ : ग्रेट भेट.

Image
                  हुबळी-धारवाडची सेलको भेट व नंतर होन्नापुरातील ग्रामस्थांशी संवाद झाल्यावर आमची बस हुबळी स्टेशनकडे निघाली. दिवसभरात खूप काही गवसल्यासारखं वाटत होतं. बसमध्ये खिडकीजवळ बसून कर्नाटकातील खेडी बघत निघालो होतो. आपल्याकडे दिसतात तीच नेहमीची दृश्ये भराभर नजरेआड होत होती. हिरवीगार शेतं, रस्त्याने जाणारी गाईगुरे, डोक्यावर गवताचा भर घेऊन जाणाऱ्या बायका, चौकातल्या दुकानांवरचे कानडी फलक इत्यादी दृश्ये बघत असताना बसने धारवाडमध्ये कधी शिरकाव केला तेच कळलं नाही. धारवाडमध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच सेलकोच्या गतीला आर्थिक उर्जा देणाऱ्या कर्नाटक ग्रामीण विकास बँकेचं (KGVB) मुख्यालय दिसलं. एका ठिकाणी शाळा सुटली होती. पोरं घरी निघालेली. आमच्या सलग दहा-बारा गाडया दिसताच पोरं हात दाखवत ओरडायला लागलीत. लहानपणचे दिवस आठवलेत. ट्रेन मध्ये गेल्यावर डायरीत हे सगळं टिपायचं व त्यानंतर उद्याच्या भेटीचा गृहपाठ आजच करायचा हे पक्क केलं. त्याला कारणही तसंच होतं. दुसऱ्या दिवशी बेंगलोरमध्ये आम्ही नारायणमूर्तींना भेटणार होतो. इन्फोसिसमधल्या या ग्रेट भेटीची सर्वांनाच उत्सुकता होती. हुबळी स्टेशनवर पोच

जागृती यात्रा भाग ४: सेलको: जगणं उजळवताना..

Image
       यात्रेत जमलेले सर्व यात्री हे एकाच मांदियाळीतले होते. या साऱ्यांच्या तोंडी स्वत:च्या देशाच्या भावी विकासाचं सुप्त होतं. भारताच्या विविध भागांतून आलेली ही टीम सारा भारत बघायला,शोधायला जाते हे खरंय, पण त्याच्याच अगोदर या ट्रेन मध्ये विविधरंगी-विविधढंगी भारत जमलेला होता. ट्रेनमध्ये अगदी पहिल्या दिवशीच भारताच्या २४ राज्यांतले व २३ देशातील असे ४७ रंग एकमेकांत लीलया मिसळले. पहिला दिवस ही पुढच्या चौदा दिवसांची रिहर्सल होती. पुढील चौदा दिवस ट्रेनमध्येच अर्ध्यापेक्षा अधिक वेळ रहायचं होतं व म्हणून या नव्या रुटीनला रूळावं म्हणून पहिला दिवस सर्वांनी जागृतीच्या शेड्युलनुसार ट्रेनमध्येच घालवला. पहिल्या दिवशीच पुढच्या चौदा दिवसांच्या खडतरपणाची जाणीव झाली. जागृती ही एक 'अ‍ॅडवेंचर जर्नी' असल्याने मनाची तशी तयारीही झाली होतीच. दुसऱ्या दिवशी यात्रेतली पहिली भेट आम्ही देणार होतो हुबळी-धारवाड व तिथून काही अंतरावर असलेली खेडी. बेंगलोरमधील 'सेलको' नावाच्या सौरउर्जेच्या क्षेत्रात लक्षणीय काम करणाऱ्या या कंपनीची खेडयातील कामगिरी, त्यांनी तिथं उभारलेलं आर्थिक मॉडेल व गावकऱ्यांशी संवाद अ

जागृती यात्रा भाग ३: एका सुप्ताची सुरुवात.

                         ...अखेर यात्रेचा दिवस उजाडला. भारताच्या २४ राज्यांतून व इतर २३ देशांतून आलेले यात्री सकाळी अकराच्या दरम्यान आयआयटी मुंबईच्या सभागृहाबाहेर जमले होते. सर्व चेहरे एकमेकांना नवीनच. काही ठिकाणी ओळख परेड सुरू होती , तर काही ठिकाणी हातात नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन नुकताच जमलेला घोळका . कुणी फोनवर बोलण्यात मग्न होते , तर कुणी रजिस्ट्रेशन करण्यात व्यग्र . असा हा सारा विखुरलेला घोळका जेवणाच्या अनाउन्समेंटने एकत्र आला. दुपारच्या जेवणानंतर लगेच ’जागृती यात्रे’च्या उदघाटनाचा कार्यक्रम सुरू होणार होता. सर्वांचं जेवण आटोपलं. हळूहळू एकेक पाय सभागृहाकडे वळू लागले.                                   दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.  उदघाटक होते जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर. माशेलकरांनी यात्रेचं औपचारिक उदघाटन केलं. पण सगळ्यांना आतुरता होती, ती त्यांच्या भाषणाची. सर्व यात्रींसमोर माशेलकरांनी छान भाषण केले. त्यांच्या भाषणात ’क्रिएटिव्हिटी,एक्सलन्स, इंडियन माइंड्स व एज्युकेशन’ या चारींचा सुंदर मिलाफ जमला होता. स

जागृती यात्रा भाग २: यात्रेबद्दल थोडसं..

Image
         गेल्या ब्लॉगमध्ये ज्या युवकांचा उल्लेख केला होता, ते ज्या ज्ञात-अज्ञात भारतप्रवासासाठी जमले होते, तो प्रवास म्हणजे "जागृती यात्रा". जागृती यात्रा ही खंड:प्राय व धर्मनिरपेक्ष भारताची शोध व परिवर्तन यात्रा आहे. ही यात्रा उत्तर प्रदेशातील 'जागृती सेवा संस्थान'कडून दरवर्षी आयोजित केली जाते. राजकीय-सामाजिक,विज्ञान-तंत्रज्ञान व आर्थिक गोष्टींची उत्तम जाण असलेले ध्येयवादी युवक-युवतींची निवड या यात्रेसाठी केली जाते. यात काही आंतरराष्ट्रीय यात्रींचाही सहभाग असतो. जागृती यात्रा ही भारतातील एवढया मोठया प्रमाणावर होणारी एकमेव वार्षिक रेल्वे यात्रा आहे. दरवर्षी ही यात्रा मुंबई येथून २४ डिसेंबरला सुरु होते व साधारणत: जानेवारीच्या दुसऱ्या आठवडयात संपते. या ध्येयवादी युवक-युवतींना उद्योगाच्या माद्यमातून देशासाठी काहीतरी विधायक कार्य करायला प्रेरित करायचं, हा या यात्रेचा हेतू असतो. या यात्रेची ट्यागलाईन एका वाक्यात सांगते त्याप्रमाणे - " 1 Train | 12 Destinations | 15 Role Models |15 Days | 450 Youths | 9000 kms ...A Journey of discovery and transformation

जागृती यात्रा भाग १: प्रवास एका प्रवासाचा...

         दिल्लीच्या IGIB (Institute of Genomics and Integrative Biology) त मायाक्रोबायोलोजीमध्ये पीएचडी करणारा नीरज भट. नीरज मूळचा गुजरातमधल्या उनाचा. IGIB त पीएचडीच्या सुरुवातीच्या काळात एका विषयात आवड नाही म्हणून पीएचडीचा विषय बदलला. असं चार-पाच वेळा झालं. पाचवेळा गाईड बदलले म्हणून IGIB त त्याला 'द्रौपदी' म्हणून चिडवताहेत. तो राहतो तिथून जवळच असलेल्या तिमारपूरच्या झोपडपट् टीतील मुलांना दररोज दोन तास शिकवायला तो जातो. गुजरात मध्ये असताना देखील तिथल्या डांग व दहाड जिल्ह्यातील आदिवासींना 'मश्रूम कल्टीवेशन ट्रेनिंग ' देणाऱ्या टीम मध्ये हा असायचा. आदिवासींना कमी श्रमात व बारमाही पोषक अन्न मिळावे यासाठी मश्रूम, ही याच्याच सुपीक डोक्यातून निघालेली आयडिया! पीएचडी नंतर ग्रामीण विकासासाठी त्याला स्वत:ला वाहून घ्यायचंय.         पुण्याजवळच्या पाबळचा दीपक आडक. पाबळ मधल्या विज्ञान आश्रमात तो अकाऊटंट आहे. पाबळचा विज्ञान आश्रम शालेय शिक्षणामध्ये अनुत्तीर्ण झालेल् या मुलांना मोफत विज्ञान-तंत् रज्ञान शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत करते. आश्रमाच्या