Posts

Showing posts from February, 2011

दुर्गा भागवतांचं लेखन: भाग १

                सध्या दुर्गा भागवतांचं ' भावमुद्रा ' नावाचं पुस्तक वाचतोय. ' भावमुद्रा ' मध्ये  दुर्गाबाईंच्या काही निवडक लघु निबंधांचा समावेश आहे. दुर्गाबाईंच्या एकूण साहित्यावर एक ओझरती नजर जरी टाकली तरी आपल्या लक्षात येते की, बाई निसर्गवेड्या आहेत. त्यांच्या निसर्गप्रेमाचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांचं ' ऋतुचक्र '. 'ऋतुचक्र' ने दुर्गाबाईंना तमाम मराठी वाचनवेड्या रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिलेलं आहे. दुर्गाबाईंबद्दल बोलायचं अथवा लिहायचं  म्हटलं तर निसर्गाचा उल्लेख ओघानंच येतो. निसर्गावर दुर्गाबाईंनी अतोनात प्रेम केले. फक्त निसर्गावरच नव्हे तर निसर्गातल्या प्रत्येक पशु-पक्षी, जीव-जंतुंवरती त्यांनी प्रेम केलं. निसर्गाचं, सृष्टीचं दर्शन त्यांनी अगदी डोळे भरून घेतलेलं आहे. त्यातल्या पशु-पक्ष्यांचं व छोट्या जीव-जंतुंचं  जीणं बाईंनी लहान मुलाच्या डोळस कुतूहलानं टिपलेलं आहे. पशु-पक्ष्यांच्या, जीव-जंतुंच्या बारीक-सारीक हालचालींचा अभ्यास त्यांनी अगदी निरागसपणे केलेला आहे. त्यामुळेच दुर्गाबाई फक्त मोठे पशु-पक्षीच नव्हे तर फुलपाखरू,

प्रेमात तुझ्या मी...

प्रेमात तुझ्या मी माझ्यात नकळत पडलो, कळले न कसे मला, मी मजला कधी विसरलो. सौंदर्य नितळ तुझे हे असे मन धुंद वेडे होई जसे, सांगू तुला मी आता कसे पाहता तुजला मला काय भासे. केशसंभार तुझा जेव्हा तू हळूच सावरशी , हाय! हृदयातून तेव्हा सुप्त ज्वाला पेटवीशी. निशा तुझ्या केसांमधली अंधारी ही अशी, सांजेला त्यात उगवण्यासाठी वेडा होई शशी. लोचनांच्या तुझ्या त्या लडिवाळ हरकती एकांतात असलो की अजूनही आठवती. चंचल नयन तुझे, कधीतरी नजरानजर होई, अन नकळत तनी माझ्या वीज चमकून जाई. ओठ तुझे ते गुलाबी-कोमल, फुलांच्या पाकळ्या जणू चुम्बुनी घ्यावे अन विलग करावे ओले दव कणु. अधर नव्हेत, हे तर आसुसलेले क्षण गं बावरी ! कवेत ये आता माझ्या, मला मोह न आवरी.                                                   - प्रथमेश आडविलकर.